Saturday, August 13, 2011

मन

मन माझ मागे धावतय,
प्रवासातल्या आठवणीत रमतय,
चहाच्या
बागेत हुंदडतय,
तुझ्या सहवासात शहारतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!


नारळाच्या झाडांना,
समुद्री किनारांना,
हिरव्यागार डोंगरांना,
प्राण्या साठवून ठेवतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!

जंगलातल्या प्राण्यांना,
तळ्यातल्या पक्ष्यांना,
मसाल्यातल्या पदार्थांना,
नाव अन गंधासहित आठवतंय
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!

त्या स्पर्शाला, त्या श्वासांना,
मन पुन्हा पुन्हा अनुभवतय,
निशब्द लयीतील त्या गाण्याचे बोल,
आजही ओठांवर गुणगुणतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!

नसेल पुढे ह्यातलं काही,
राहतील
फक्त आठवणी,
पण
उजळतील दिशा दाही,
उलगडतील
मनीची पाने नवी..
लिहितील
पुन्हा एक काव्यकहाणी!
आठवणींना
बरोबरघेऊन अन,
आपल्या
हातात नवी सोबत ठेऊन!
मन
त्याच क्षणाची वाट पाहतंय........!!








Thursday, August 11, 2011

सांग न ग आई.......

सांग न ग आई.......

हे असं सगळं व्हायलाच पाहिजे का?
आई, हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

तूच तर मला शिक्षणाचे बाळकडू पाजलेस,
तूच नाही का संस्कारांनी मला मोठे केलेस,
बाबांनीच तर बोट धरून चालायला शिकवले,
भांडूनही भावाशी ज्या मनमोकळं बोलले...
त्या तुम्हा सर्वांना सोडून, मी लांब जायलाच पाहिजे का?
सांग , हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

तुम्ही मला प्रेमानी जे नाव दिले,
ज्या नावानी माझी वेगळी ओळख दिलीत!
यश-अपयशाचे ऋतू मी ज्या घरात पाहिले,
माझ्या आसवांना ज्यानी त्याच्या मनात लपविले!
त्या नावाला घराला, मी बदलायलाच पाहिजे का?
सांग ,हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

वीस वर्ष तुमच्या प्रेमात मी ओथंबून न्हाहले,
अन दोन महिन्यांपुर्वीच तर मी "त्याला" पाहिले!!
त्याच्या राज्यात असतील मला सगळेच
असंनोळखी,
एका क्षणातच तरीही माझी बदलतील नाती...
ह्या नवख्या माणसाला, मी सर्वस्व द्यायलाच पाहिजे का?
सांग आई, हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

निर्णय

निर्णय घ्यायचाय आजच
अन तोही पूर्ण विचारांती,
कारण त्यावरच लिहिल्या जातील
उद्याच्या काही काव्यपंक्ती!!

आपलेही अन परकेही
आता देतील अनेक सल्ले.....
पण डोक्यावर आपल्याच आहे
त्या जबाबदारीचे ओझे!!

स्वीकारायचेत परिणाम
चांगले अन वाईटही,
कारण असतातच दोन बाजू...
नाण्याला कुठल्याही!!

म्हणुनच,
निर्णयाच्या मागे
एक ठाम विचार हवा....
कारण तोच असेल आपल्या
भविष्याचा ठेवा!!