निर्णय घ्यायचाय आजच
अन तोही पूर्ण विचारांती,
कारण त्यावरच लिहिल्या जातील
उद्याच्या काही काव्यपंक्ती!!
आपलेही अन परकेही
आता देतील अनेक सल्ले.....
पण डोक्यावर आपल्याच आहे
त्या जबाबदारीचे ओझे!!
स्वीकारायचेत परिणाम
चांगले अन वाईटही,
कारण असतातच न दोन बाजू...
नाण्याला कुठल्याही!!
म्हणुनच,
निर्णयाच्या मागे
एक ठाम विचार हवा....
कारण तोच असेल आपल्या
भविष्याचा ठेवा!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.